Thursday, April 15, 2010

मुलनिवासी बहुजन समाजाची स्थिती व गुलामीची समस्या

मुलनिवासी बंधू भगिनिनो,बामसेफ ही गेली 30 वर्षे फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित समग्र सामाजिक क्रांती व व्यवस्था परिवर्ताना करिता कटीबद्ध असलेले व मुलनिवासी बहुजानामधे जागृती-संघटन-नेतृत्व-चळवळ निर्मिती करण्यासाठी अविरत कार्यरत असलेले राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटन आहे. राष्ट्रीय मुलनिवासी संघ हे मुलनिवासी बहुजनांच्या संवैधानिक हक्क-अधिकाराकरिता व्यापक जागृती-आंदोलन करण्यासाठी कार्यरत असलेले सामाजिक संघटन आहे.बामसेफ म्हणजे बॅक्वर्ड अँड माइनोरिटी कम्यूनिटीस एंप्लायीस फेडरेशन. बॅक्वर्ड म्हणजे ओ.बी.सी., एस.सी. व एस. टी. मधे समाविष्ट असलेल्या सर्व जाती. माइनोरिटी कम्यूनिटीस म्हणजे एस.सी. एस. टी. व ओ.बी.सी तून धर्मांतरित झालेला वर्ग (उदा. जैन, लींगायात, बौध, मुस्लिम, शिख, ईसाई, ख्रिस्चन इ.) . बामसेफ ची अशी मान्यता आहे की अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्ग आणि धर्मांतरित वर्ग हा भारताचा मुलनिवासी आहे व बहुसंखेने आहे. या मुलनिवासी बहुजन समाजास बामसेफ संघटित करते.राष्ट्रीय मुलनिवासी संघ बहुजन समाजातील महिला, विद्यार्थी, नवयुवक, व्यावसायिक यांना संघटित करून संवैधानिक हक्क अधिकारासाठी संघर्ष करण्यासाठी व मुलनिवासी बहुजनांचे राष्ट्रव्यापी जनआंदोलन पुर्णनिर्माण करण्यासाठी कटीबद्ध असलेले संघटन आहे.मुलनिवासी बहुजन समाजाची स्थिती व गुलामीची समस्या-मुलनिवासी बहुजन समाज हा जाती-जाती मधे विखंडित-विभाजित आहे. त्यामुळे प्रत्येक जात ही ‘अल्पसंख्यंक’ आहे. या ब्राम्हणवादी व्यवस्थ्येमुळे मुलनिवासी बहुजन समाजामधे विषमता व जाती संघर्ष कायम आहे. ब्राम्हणवादी व्यवस्थ्येने मुलनिवासी बहुजन समाजाला हजारो वर्षे अधिकार वंचित व गुलाम ठेवले आहे. या व्यवस्थ्येमुळे अल्पसंख्यंक ब्राम्हण हा या देशाचा मालक झाला व मुळचे लोक गुलामिचे जीवन जगात आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या व्यापक जनआंदोलना मुळे मुलनिवासी बहुजन समाजाला काही प्रमाणात हक्क अधिकार मिळाले. परंतु आज वर्तमान परिस्थितीत ब्राम्हणी व्यवस्था मुलनिवासी बहुजन समाजाला पुन:अधिकार वंचित व गुलाम बनाविण्यासाठी कार्यरत आहे. मुलनिवासी बहुजन समाजाला गुलाम करण्याकरिता शासक जातीचे लोक ज्या व्यापक षड्यंत्राची अंमलबजावाणी करीत आहेत ते असे-1. शिक्षणाचे खाजगीकरण करणे हा मुलनिवासी बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित करण्यचा व जनावराच्या स्तरावर पोहचवण्याचा कार्यक्रम आहे. 2. सेझ ( सेज़- स्पेशल एकनामिक ज़ोन ) च्या माध्यमातून मुलनिवासी बहुजनांचा जमिनीवरचा मालकी हक्क संपविणे व या भूभागाला विदेशी भूभाग घोषित करण्याचे षड्यंत्र. ( फॉरिन स्टेट विदिन सॉवेरेन स्टेट ) 3. मॉलच्या माध्यमातून किरकोळ दुकानदार व त्यावर अवलंबुन एकूण वीस कोटी लोकाना भिकेला लवण्याचे षड्यंत्र.4. सरकारी विभागाच्या खाजगी करणामुळे मुलनिवासी बहुजनांच्या नोकर्‍या संपुष्टात आल्या व नवयुवकामधे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली.5. 52% ओ. बी. सी. ना 27.5% आरक्षण देऊन क्रिमीलेयर लावणे म्हणजे त्याना प्रतिनिधित्व अधिकारापासून वंचित करणे.6. आज भारतात सरकारी रिपोर्ट प्रमाणे 82 कोटी लोक दारीद्र्‍या रेषेखाली जीवन जगत आहेत व त्यातील 25 कोटी लोक भूक बळी रेषेवर आहेत. महागाईमधे प्रचंड वाढ होत असून दर डोइ उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जात नाही हे सामूहिक नर संहाराचे षड्यंत्र आहे. 5. आवाहन…शासक जाती मुलनिवासी बहुजन समाजाला गुलाम करण्याचे व्यापक षड्यंत्र राबवत आहेत. याचा मुलगामी परिणाम असा, मुलनिवासी बहुजन समाज हा संविधानिक हक्क-अधिकारांपासून वंचित होऊन त्याची गुलामीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मुलनिवासी बहुजनांच्या स्वातंत्र्‍याकरिता मुलनिवासी बहुजन समाजाचे ध्रुवीकरण करून व्यापक चळवळ निर्माण करण्यासाठी बामसेफ, राष्ट्रीय मुलनिवासी संघ कटीबद्धआहे. या चळवळीचे राष्ट्रव्यापी जनआन्दोलनामधे रुपांतर केल्याने मुलनिवासी बहुजन समाजाच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते. लक्षभेदि आणि लक्षप्रेरित जागृत प्रचारक व प्रशिक्षित नेतृत्व निर्माण करणे हा या ब्लॉग चा उद्देश आहे. तरी मुलनिवासी बहुजन समाजातील बंधू-भगिनी-विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने या व्यवस्था परिवर्तन कार्यामधे सामील व्हावे, ही विनंती.जय मुलनिवासी.

मुलनिवासी बहुजन समाजाची स्थिती व गुलामीची समस्या

मुलनिवासी बंधू भगिनिनो,बामसेफ ही गेली 30 वर्षे फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित समग्र सामाजिक क्रांती व व्यवस्था परिवर्ताना करिता कटीबद्ध असलेले व मुलनिवासी बहुजानामधे जागृती-संघटन-नेतृत्व-चळवळ निर्मिती करण्यासाठी अविरत कार्यरत असलेले राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटन आहे. राष्ट्रीय मुलनिवासी संघ हे मुलनिवासी बहुजनांच्या संवैधानिक हक्क-अधिकाराकरिता व्यापक जागृती-आंदोलन करण्यासाठी कार्यरत असलेले सामाजिक संघटन आहे.बामसेफ म्हणजे बॅक्वर्ड अँड माइनोरिटी कम्यूनिटीस एंप्लायीस फेडरेशन. बॅक्वर्ड म्हणजे ओ.बी.सी., एस.सी. व एस. टी. मधे समाविष्ट असलेल्या सर्व जाती. माइनोरिटी कम्यूनिटीस म्हणजे एस.सी. एस. टी. व ओ.बी.सी तून धर्मांतरित झालेला वर्ग (उदा. जैन, लींगायात, बौध, मुस्लिम, शिख, ईसाई, ख्रिस्चन इ.) . बामसेफ ची अशी मान्यता आहे की अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्ग आणि धर्मांतरित वर्ग हा भारताचा मुलनिवासी आहे व बहुसंखेने आहे. या मुलनिवासी बहुजन समाजास बामसेफ संघटित करते.राष्ट्रीय मुलनिवासी संघ बहुजन समाजातील महिला, विद्यार्थी, नवयुवक, व्यावसायिक यांना संघटित करून संवैधानिक हक्क अधिकारासाठी संघर्ष करण्यासाठी व मुलनिवासी बहुजनांचे राष्ट्रव्यापी जनआंदोलन पुर्णनिर्माण करण्यासाठी कटीबद्ध असलेले संघटन आहे.मुलनिवासी बहुजन समाजाची स्थिती व गुलामीची समस्या-मुलनिवासी बहुजन समाज हा जाती-जाती मधे विखंडित-विभाजित आहे. त्यामुळे प्रत्येक जात ही ‘अल्पसंख्यंक’ आहे. या ब्राम्हणवादी व्यवस्थ्येमुळे मुलनिवासी बहुजन समाजामधे विषमता व जाती संघर्ष कायम आहे. ब्राम्हणवादी व्यवस्थ्येने मुलनिवासी बहुजन समाजाला हजारो वर्षे अधिकार वंचित व गुलाम ठेवले आहे. या व्यवस्थ्येमुळे अल्पसंख्यंक ब्राम्हण हा या देशाचा मालक झाला व मुळचे लोक गुलामिचे जीवन जगात आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या व्यापक जनआंदोलना मुळे मुलनिवासी बहुजन समाजाला काही प्रमाणात हक्क अधिकार मिळाले. परंतु आज वर्तमान परिस्थितीत ब्राम्हणी व्यवस्था मुलनिवासी बहुजन समाजाला पुन:अधिकार वंचित व गुलाम बनाविण्यासाठी कार्यरत आहे. मुलनिवासी बहुजन समाजाला गुलाम करण्याकरिता शासक जातीचे लोक ज्या व्यापक षड्यंत्राची अंमलबजावाणी करीत आहेत ते असे-1. शिक्षणाचे खाजगीकरण करणे हा मुलनिवासी बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित करण्यचा व जनावराच्या स्तरावर पोहचवण्याचा कार्यक्रम आहे. 2. सेझ ( सेज़- स्पेशल एकनामिक ज़ोन ) च्या माध्यमातून मुलनिवासी बहुजनांचा जमिनीवरचा मालकी हक्क संपविणे व या भूभागाला विदेशी भूभाग घोषित करण्याचे षड्यंत्र. ( फॉरिन स्टेट विदिन सॉवेरेन स्टेट ) 3. मॉलच्या माध्यमातून किरकोळ दुकानदार व त्यावर अवलंबुन एकूण वीस कोटी लोकाना भिकेला लवण्याचे षड्यंत्र.4. सरकारी विभागाच्या खाजगी करणामुळे मुलनिवासी बहुजनांच्या नोकर्‍या संपुष्टात आल्या व नवयुवकामधे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली.5. 52% ओ. बी. सी. ना 27.5% आरक्षण देऊन क्रिमीलेयर लावणे म्हणजे त्याना प्रतिनिधित्व अधिकारापासून वंचित करणे.6. आज भारतात सरकारी रिपोर्ट प्रमाणे 82 कोटी लोक दारीद्र्‍या रेषेखाली जीवन जगत आहेत व त्यातील 25 कोटी लोक भूक बळी रेषेवर आहेत. महागाईमधे प्रचंड वाढ होत असून दर डोइ उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जात नाही हे सामूहिक नर संहाराचे षड्यंत्र आहे. 5. आवाहन…शासक जाती मुलनिवासी बहुजन समाजाला गुलाम करण्याचे व्यापक षड्यंत्र राबवत आहेत. याचा मुलगामी परिणाम असा, मुलनिवासी बहुजन समाज हा संविधानिक हक्क-अधिकारांपासून वंचित होऊन त्याची गुलामीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मुलनिवासी बहुजनांच्या स्वातंत्र्‍याकरिता मुलनिवासी बहुजन समाजाचे ध्रुवीकरण करून व्यापक चळवळ निर्माण करण्यासाठी बामसेफ, राष्ट्रीय मुलनिवासी संघ कटीबद्धआहे. या चळवळीचे राष्ट्रव्यापी जनआन्दोलनामधे रुपांतर केल्याने मुलनिवासी बहुजन समाजाच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते. लक्षभेदि आणि लक्षप्रेरित जागृत प्रचारक व प्रशिक्षित नेतृत्व निर्माण करणे हा या ब्लॉग चा उद्देश आहे. तरी मुलनिवासी बहुजन समाजातील बंधू-भगिनी-विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने या व्यवस्था परिवर्तन कार्यामधे सामील व्हावे, ही विनंती.जय मुलनिवासी.

मिरज दंगल

मिरज दंगल


अफजल खानाच्या पोस्टर वरुन उसळलेलि दंगल शमली असली तरी त्याचे दूरगामी परिणाम येथील समाज जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाहित . मिरज , जि . सांगली येथील दंगल का झाली याचा ऊहापोह होने गरजेचे आहे । त्यामुळे दंगलिस कारणिभुत ठरलेले अफजल खान वधाचे प्रकरण ज़रा नजरेखालून घालुया . अफजल खान हा आदिल शाहीतील एक बलाढ्य सरदार । तो वाई प्रांताचा सुभेदार होता . शिवारायाना सम्पविण्याचा विडा त्याने उचलला होता आणि त्यासाठी तो स्वराज्यावर चालून आला होता . स्वराज्याचा शत्रु या दृष्टीने शिवाजी मं हा राज त्याच्याकडे पाहात होते . या धार्मिक रंग अजिबात नव्हता . शिवरायानी अफजल खानाला ठार मारले नसते तर राजांचेच काही बारे वाईट होण्याची शक्यता होती . त्यातच अफजल खान कपटी म्हणुन प्रसिद्ध होता . त्यामुळे शिवराय सर्व तयारीनिशी खानाच्या भेटीस गेले होते . खानाने महाराजाना आलिंगन दिल्यानंतर खानाने महाराजांच्या पाठीत कत्यारिने वार केला . परन्तु चिल्खत असल्याने महाराज बचावले व् चपळाइने त्यानी वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला . तेवढ्यात राजान्वर धावून आलेल्या सय्यद बंडाला जीवा महालेनी जागेवरच गार केला . हा झाला इतिहास . याला विरोध करण्याचे कारण नाही . परन्तु यापुढे काय झाले ते जाणीव पूर्वक दुर्लाक्षिले गेले आहे । अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवारायान्वर वार केला . राजानी तो वार चुकाविन्याचा प्रयत्न केला परन्तु कपालावर वार झालाच . महाराजांच्या कपालावर खोल जखम झाली . शिवरायांच्या आयुष्यात त्याना एकमेव जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू -ब्राम्हण होता . परन्तु त्याला कधीच हाय लाईट केले जात नाही . उलट इतकी गंभीर बाब इतिहासापासुंन लपवून ठेवण्याचे मंहापातक अनेक जन आजवर करत आले आहेत . ब्राम्हण म्हणुन कोण मुलाहिजा करू पहातो ? हे शिवाजी राजांचे विचार . मग असे असताना अफजल खानाबरोबर कृष्णा कुलकर्णीचाहि इतिहास समाजासमोर मांडायला हवा , पण तसे होत नाही . जावळीच्या चंद्ररव मोर्यान्साराख्या काही मराठा सरदारांचा स्वराज्याला विरोध होता . मग जावळीच्या मोरेंची जर शिवरायांचे शत्रु म्हणुन मान्डनी केलि जात असेल तर कृष्णा कुलाकर्निकडे केवल ब्राम्हण म्हणुन दुर्लक्ष करायचे का ? तोही स्वराज्याचा शत्रु होता ही बाब अग्रक्रमाने का मांडली जात नाही ?

मराठा आरक्षण

एकुणच आरक्षणाचा विषय भावनिक पातळीवर पोहचल्याने यासंधर्भात अत्यंत सावधपणे विचार करण्याची गरज आहे। मूळात आरक्षनाची गरज आहे की नाही ? आणि असल्यास ती का आहे व् कोणाला ? या प्रश्नान्चाही विचार प्रामुख्याने केला गेला पाहिजे। आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही।हजारो वर्षे येथील बहुजन समाजावर धर्माच्या नावाने अन्याय अत्याचार चालु आहेत। यातून मराठा समाज ही सुटलेला नाही । वैदिक धर्मानुसार ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण निर्माण करण्यात आले। परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर येथे एकही क्षत्रिय उरला नाही। कलियुगात फ़क्त ब्राम्हण व् शुद्र हे दोनच वर्ण अस्तित्वात आहेत, असे येथील धर्मशास्त्र सांगते। छ। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातील एकही ब्राम्हण तयार झाला नाही . त्याचप्रमाणे छ . शाहू महाराजाना वेदांचा अधिकार नाकारून ब्राम्हण आणि त्यान्च्यालेखि मराठ्यांची काय किंमत आहे ते दाखवून दिले । शूद्र मानल्यागेलेल्या 85% बहुजन समाजाला शिकायला बंदी घातली गेली. रोटिबन्दि, तटबंदी, भेटबंदी ई. अन्य्ययकारक गोष्टी बहुजन मराठा समाजावर लादण्यात आल्या. हजारो वर्षे ज्यांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक गळचेपी करण्यात आली त्याना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष संधि देने भाग आहे। अशी संधि म्हणजे त्यांचा अधिकाराच आहे, ते कुणाचे उपकार नव्हेत। हा विचार करुनच राजर्षि शाहू महाराजानी १९०२ साली आपल्या संस्थानात बहुजन समाजाला सरसकट 50% आरक्षणदिले। यात मराठा समाजाचाही समावेश होता। म्हणजे मराठा समाज ही आरक्षणाचा हक्कदार आहे, हे लक्षात येइल। मुळात मागास वर्गाच्या आरक्षणामुळे समाज इतका ढवळून निघत असताना मराठ्यांच्या आरक्षणाचा विचार तर दूरच मुख्य प्रश्न आहे तो मानासिकतेचा। आणि ती मानसिकता आहे उच्च वर्णियान्च्या अहंकाराची आणि बहुजनान्च्या न्यूनगंडाची । ही सर्व परिस्तिथि लक्षात घेउन मराठा सेवा संघ व् समविचारी संघटनानी सध्याच्या आरक्षणाला धक्का ना लावता मराठ्याना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे। आज काही ब्राम्हण संघटनानिही १०% आरक्षणाची मागणी केली आहे। परंतु मराठ्यांचे आरक्षण आणि ब्राम्हणाचे आरक्षण यात जमीन आसमानाचा फरक आहे। ज्याना पूर्वी संधि नाकारण्यात आली होती अशाना संधि उपलब्ध करून देने हे आराक्षनाचे मुख्य धोरण आहे। ब्राम्हानाना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अथीक, शैक्षणिक आशा सर्वच क्षेत्रात संधि उपलब्ध होत्या। मराठा व् इतर बहुजनाना मात्र अशा संधि नाकारण्यात आल्या होत्या। आज जरी काही मराठे सधन असले तरी अनेक लोक हलाखीचे जीवन जगात आहेत। जर मराठा आरक्षण मंजूर झाले तर मराठ- दलित हे सम्बन्ध ही सुधारातिल। अर्थात मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मराठ्याना आराक्षनाची गरज आहे आणि ती सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्यात आली तरच मराठ्याना न्याय मिळेल। मराठ्यानिहि आरक्षणाचा विचार बुद्धिवदातून केला पाहिजे. शेवटी न्याय मिळवायचा असेल तर प्रस्थापित व्यवस्थेशि संघर्ष केलाच पाहिजे.

Monday, April 12, 2010

महाराज्यांच्या नावाखाली काहीही

सर्व मुस्लिम समाजाला टारगेट करण्याचा प्रयत्न -

अफजल खानाचा शिवरायानी वध केल्यानंतर त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व (धार्मिक नव्हे ) शिवरायानी तिथेच संपवून टाकले . ज्या शत्रूला आपण स्वताच्या हाताने ठार केले त्याचीच कबर सन्मान पूर्वक प्रताप गडावर उभार णारा राजा एक्मेवाद्वितियच म्हणावा लागेल . शिवरायांचे मोठेपण नेमके याच्यात आहे . त्यानी कधीच परधर्माचा द्वेष केला नाही . पर्धर्मियाना नेहमी सन्मानाने वागविले .युद्धाच्या प्रसंगी कोणत्याही धार्मिक स्थळाना अथवा धर्म ग्रंथाना हानि पोहचवायची नाही शिवरायांचा दंडक होता . परंतु आज नेमके त्याच्या उलट वर्तन चालले आहे . अफजल खानाच्या नावाखाली मुस्लिम द्वेष करायचा किंवा त्याना बोचेल अशी इतिहासाची मान्डनी जाणीव पूर्वक करायची , असे प्रकार सर्रास घडत असतात . अफजल खान वधाच्या त्याच्यावर द्वेष मूलक मजकुर लिहिला जातो ते टाळले पाहिजे . अफजल खान मुसलमान होता म्हणुन तो स्वराज्याचा शत्रु नव्हता . किवा तो स्वराज्याचा शत्रु होता म्हणुन सर्व मुसलमान स्वराज्याचे शत्रु आहेत , असेही कुणी समजू नये . सर्व जाती -धर्माचे मावळे शिवरायांच्या पदरी होते . दौलत खान दर्यासारंग हा मुसल मान त्यांचा आरमार प्रमुख होता . नुरखान बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदल प्रमुख होता . इब्राहिम खान नावाचा मुसल मान त्यांचा पयदळ प्रमुख होता । काझी हैदर हा मुसल मान त्यांचा वकील , न्यायाधीश होता. मदारी मेहतर हाही त्यांच्या दरबारी आहे . मुसल मान मौनी बाबा त्यांचे गुरु होते . राजांच्या अन्गरक्शंकापैकी अर्धे मुसल मान होते । आणि ही प्रमाणिक , जीवाला जीव देणारी मानसे होती . आयुष्यात त्यानी कधीही राजांशी गद्दारी केलि नाही . असे असताना फ़क्त अफजल खान वध हे एकच प्रकरण समाजासमोर नेहमी मान्दायाचे आणि राजांच्या पदरी असणार्या प्रामाणिक मुसल मान मावळ्याकदे दुर्लक्ष करायचे , हे कितपत बरोबर आहे . शिवरायांचे कर्तुत्व फ़क्त अफजल खान वधापुराते मर्यादित नाही याचे भान आम्ही ठेवणार आहोत की नाही ? शिवरायांच्या चरित्राचा चिकित्सक अभ्यास करून ते विचार , तो आचार आम्ही आमच्या आचरणात आणले तर “मिरज दंगली ” सारख्या वाईट घटना आम्ही तालू शकतो । मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात ना , “शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेवून नाचायाचे विषय नाहित तर डोक्यात घालायचे विषय आहेत .”
दंगलीचा प्रचार आणि प्रसार -मिरज येथे झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत तेल ओतण्याचे काम केले ते प्रचार प्रसार माध्यामानी । अनेक वर्त्तमान पत्रातून दूर चित्र वाहिन्यांवर तोडफ़ोडीची दृश्ये सतत दाखविल्यामुळे येथे घडलेल्या दंगालिचे पडसाद सांगली , आस्था , कोल्हापुर , इचलकरंजी आदि ठिकाणी उमटले । त्याचप्रमाणे मोबाईल आणि इन्टरनेट या आधुनिक संपर्क साधनांच्या आधारे या दंगालिच्या विडियो क्लिप्स सर्वदूर पोहचावल्या । काही तासात यु ट्यूब वरील मिरज दंगलिची विडियो क्लिप पाहानार्यांची संख्या होती जवळ जवळ १७०००। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा जाणीव पूर्वक प्रचार प्रसार करण्यात आला आणि त्यामुळे समाजात असंतोष पसरायला वेळ लागला नाही । मिरज दंगलिची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे । जे दोषी असतील त्या समाज कन्टकाना कठोर शिक्षा झाली पाहिजे । आणि यापुढे असे प्रकार होवू नयेत म्हणुन शिवरायांचे खरे चरित्र समाजासमोर मांडले पाहिजे। शिवरायांचा लढा कोणत्याही जाती -धर्माविरुद्ध नव्हता तर स्वराज्याशी बेइमानी करणार्या , इथल्या मातीवर अत्त्याचार करणार्या सैतानान्च्या विरुद्ध होता । सर्व धर्म सम भावानेच आयुष्यभर जगले । त्यांच्या पश्चात आम्ही त्यांच्याच आचार विचाराना काळिमा फासला तर शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आम्हाला उरणार नाही । जय जिजाऊ , जय शिवराय , जय मूलनिवासी